भारत विरुद्ध पाकिस्तान India vs Pakistan Today Match
आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होता.श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुपारी 3 वाजता सुरु झाला. कोलंबो येथील स्टेडियमवर हा सामना होत असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यामुळे कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पाकिस्तानने 2 पॉईंट्स मिळवले आहेत. तर भारत सुपर 4 मधील हा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत खेळणार आहे. १) भारत आणि पाकिस्तान चे खेळाडू २) भारताची फलंदाजी ३) पावसामुळे सामना थांबला
Asia cup 2023 IND vs Pakistan-
भारत विरुद्ध पाकिस्तान-India vs Pakistan Today Match –
कोलंबो येथील स्टेडियमवर हा सामना होत असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यामुळे कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पाकिस्तानने सुपर 4 मधील सामना जिंकून 2 पॉईंट्स मिळवले आहेत. तर भारत सुपर 4 मधील हा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत खेळणार आहे
१) भारत आणि पाकिस्तान चे खेळाडू –
भारत: रोहित शर्मा, शुबमन, विराट कोहली, के.एल. राहुल, इशान किशन, पांड्या, जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, बुमराह,आणि सिराज.पाकिस्तानः बाबर आझम, शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
२) भारताची फलंदाजी –
रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच श्रेयस अय्यरच्या जागी के.एल. राहुलचा समावेश करण्यात आला आहे. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलची चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाले होते. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी १२१ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. शाहीन ने कर्णधार रोहितला बाद केले. रोहित शर्मा ने आणि शुबमन ने एकदिवसीय असे आपले ५०वे अर्धशतक पूर्ण केले. शादाब च्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्याने नेपाळविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा ४६ चेंडूत ५५ धावा आणि शुभमन गिल ४४ चेंडूत ५३ धावा करत फलंदाजी करत आहे. १७ व्या षटकात शादाब खानने कर्णधार रोहित शर्माला कॅच घेऊन बाद केले. रोहित शर्माने ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुबमन गिल ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या . शाहीन आफ्रिदीने शुबमन गिलला बाद केले . त्यानंतर कोहली आणि राहुल हे मैदानात उतरले. विराट कोहली १५ चेंडूत ७ धावा आणि के. एल.राहुल २७ चेंडूत १७ धावा करत फलंदाजी करत आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान-India Asia cup 2023-
३) पावसामुळे सामना थांबला –
मुसळधार पावसामुळे सामना थांबवला गेलाय. सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे २४.१ षटकात २ प्लेअर गमावून १४७ रण केल्या होत्या. विराट कोहली १६ चेंडूत ८ रन आणि के.एल. राहुल २८ चेंडूत १७ रन करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ २४.१ षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल. जर हा सामना झाला नाही तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. कारण पाकिस्तान संघाने सुपर-४ फेरीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणजेच पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला तर संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. आणि टीम इंडियाला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. तेव्हा टीम इंडियाने हा सामना गमावल्यास अंतिम फेरी गाठण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १३३ एक दिवसीय सामने खेळले गेले आहेत.